हिमवर्षाव

Blogger Tricks

बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१२

कसाब ( चोरी चोरी ,चुपके चुपके )

कसाब कसा मेला म्हणजे फाशीच्या दोरी मुळे की डासामुळे ह्यावर सध्या पब्लिक चर्चा करत आहे. त्यांच्या आणि लादेन च्या मृत्यू बाबत असे गूढ वलय निर्माण झाले आहे हा योगायोग की अमेरिकन सरकार व आपले प्रशासन आजकाल मित्र असल्याने ,,,, असो . मह्त्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला फाशी देण्याची बातमी सरकारने मस्त रंगवून दिली आहे . एकदम गुप्तहेर कथेप्रमाणे गोपनीय , पण कल्पना करा जर त्यांची फाशीची शिक्षा सरकारने १ आठवडा आधी जाहीर केली असती कदाचित लोकांच्या मनात शंका निर्माण झाली नसती पण प्रसार माध्यमांनी मात्र जो काही धुमाकूळ घातला असता त्यांची मी कल्पना केली


 प्रत्यक्ष फाशीच्या दिवशी  सकाळी सात वाजल्यापासून काही वृत्त निवेदक आर्थर रोड च्या बाहेर जमले असते आणि मग मिनिटा मिनीटाला तीच तीच बातमी परत परत जाहिरातीच्या मध्ये सांगत राहिले असते ,
 आता कसाब ने आंघोळ केली 

,आता त्याने जेवण केले 

( ब्रेकिंग न्यूज कसाब ने आज शेळी चे दुध प्यायले .)

 कसाब ने लाल रंगाचा शर्ट काळ्या रंगाची विजार घातली आहे. 

आणि कसाब च्या फाशीच लाइव्ह प्रक्षेपण प्रायोजित बाय ,,,,,, अश्या जाहिरीती चा वर्षाव झाला असता. अश्या बातम्या चालू असतांना मग ह्या हल्ल्यात बळी गेलेल्या लोकांच्या घरी प्रसार माध्यमे घुसून घुसून , ( आता तुम्हाला काय वाटतंय ? ) असे विचारून त्यांच्या जखमेवरची खपली काढली असती.
 मग फाशी कशी देतात , त्या दोरीची लांबी ,रुंदी ह्याच्याबद्दल मौलिक माहिती मग जल्लाद ची मुलाखत , मग भारतात फाशी किती दिल्या गेल्या ह्यावर एक रटाळ पण उद्बोधक माहितीपट असे अजून बरेच काही चालले असते. सामान्य प्रेक्षकाला त्यात अजिबात इन्ट रेस्ट नसतो , त्याचे सारे लक्ष ह्या कार्यक्रमाच्या मध्ये कोणत्या जाहिराती कितीवेळा दाखवणार ह्याकडे लागून राहिले असते.


कहर म्हणजे कसाब ला भर चौकात फाशी द्यावी का ह्यावर एस एम एस वर मत मागवली असती. मग चार राजकीय पक्षांच्या प्रवक्ते बोलवून त्यांच्यात कलगी तुरा रंगवला असता. मग ह्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी भांडणे केली असती. अनेक उत्साही लोक जेल बाहेर जमून घोषणा देत बसले असते. अनेक क दर्जाचे अभिनेते जे एरवी नियमित पणे कर सुद्धा भरत नाहीत त्यांनी मुलाखती देऊन देश प्रेमावर आमच्या मनोज कुमार ला न्यून गंड यावा इतके मोठे भाषण दिले असते.
 इंग्रजी प्रसार मध्यम महेश भट्ट , अरुधात्ती राय ह्यांची अमूल्य मत जनतेला दाखवत असती. 

संयुक्त राष्ट्रे, दि. २० (वृत्तसंस्था) - मृत्युदंड-ाची शिक्षा कायमस्वरूपी हद्दपार करावी अशा आशयाच्या संयुक्त राष्ट्र सभेत (युनो) मांडलेल्या प्रस्तावाला हिंदुस्थानसह ३९ देशांनी कडाडून विरोध केला आहे. प्रत्येक देशाला आपापले कायदे ठरविण्याचा अधिकार आहे, असा जोरदार युक्तिवाद हिंदुस्थानने युनोच्या आमसभेत केला. या प्रस्तावाला ११० देशांनी पाठिंबा दर्शविला असून ३६ देशांनी तटस्थ राहणे पसंत केले आहे. आताच्या प्रगत युगात गुन्हेगारांना मृत्युदंडासारखी रानटी शिक्षा देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सर्व देशांनी या शिक्षेबाबत फेरविचार करून ती रद्द करावी असा ठराव युनोच्या आमसभेत आज मांडण्यात आला. ११० विरुद्ध ३९ अशा मतांनी तो मंजूरही केला. मात्र प्रस्तावाची अंमलबजावणी बंधनकारक नसून स्वैच्छिक असली तरी त्याच्यासाठी जागतिक जनमताचा दबाव विरोध करणार्‍या देशांवर पडणार आहे.............................. ही  आजच्या सामन्यामध्ये बातमी आली आहे ,

 तेव्हा फाशी हवी की नको ह्या विषयावर बौद्धिक हस्त मैथुन करण्यात आले असते. आणि हे करण्यात सो कोल्ड विचार जंत जमले असते.

 आबा तुम्ही हे काय केले ?
 त्या बिचार्या प्रसारमाध्यमांच्या हातातून एवढी सोन्याची अंड देणारा इव्हेंट तुम्ही चोरी .चोरी चुपके चुपके उरकला त्यांचा टी आर पी बुडाला आता अशीच अफजल गुरुची गोड बातमी शिंदे साहेबांनी द्यावी.

 त्यांचे एक वक्तव्य आज प्रकाशित झाले आहे. अफजल ची फाईल माझ्या टेबलावर आली . तर ४८ तासात तिच्यावर मी सही करेन तो सोनियाचा दिवस उजाडला   

 की मात्र ह्या बिचाऱ्या प्रसार माध्यमांना नक्की कळवा, क्या करे गंदा हे पार धंदा हे ये.

९ टिप्पण्या :

  1. विजय जी
    ह्या लोकांना पैसा आणि टी आर पी एवढेच दिसते, त्यामुळे विषयाचे गांभीर्य नष्ट होऊन
    सर्कस सुरु होते.

    उत्तर द्याहटवा
  2. mast lekh aahe, pan manat ajunahi shanka aahe ki kasab dengue ne marnachya javlpas pan pochala asel mhanun fashi dili asel. jar sarkar ne afjal guru la pan lagech (3-4 months)fashi dili tar kadachit watel ki kasab la dileli fashi manapasun dili aahe..

    उत्तर द्याहटवा
  3. अमोल कसाब ला फाशी देण्यामागे राजकारण आहे ,
    असा आरोप अनेक जण करत आहेत.
    पण आजच्या काळात सगळेच पक्ष आपल्या सोयीचे राजकारण करतात. आणि कोणत्याही घटनेतून राजकीय फायदा घ्यायला टपले असतात.
    लादेन व कसाब ह्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मृत्यू बद्दल अनेक तर्क वितर्क करण्यात आले , त्यामागे अनेक थिअरी मांडण्यात आल्या. ह्याचे कारण भारत व अमेरिकेने ही कारवाई अत्यंत गुप्ततेने उरकली.
    आता कसाब कसा मेला ह्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे
    तो फासावर चढला ही जगात अधिकृत बातमी आहे. आज समजा भाजपाचे सरकार सत्तेवर आले व मोदी ह्यांनी पंत प्रधान झाल्यावर लगेच कसाब ला फाशी दिली असती तर ह्याचे भांडवल केले नसते का ?
    येथे आभासी जगतात आपण आपली लाल करायची ,चमकोगिरी करायची एकही संधी सोडत नाही
    राजकारणी तर १ नंबरचे संधी साधू
    तो मोहरा होता , वजीर अजून जिवंत आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. एकाचा निकाला लावला गेला.
    खरच कित्ती मोठ्ठा पराक्रम.
    अभिनंदन
    चला एव्ह्ढे हि नसे थोडके.

    एका एकी चांडाळ चौकडी आख्या मुंबईची नाही तर पूर्ण देशाची चार दिवस वात लावत राहतात.
    आणि आपण फक्त हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतो.
    खर म्हणजे, सगळे हास्यास्पद आहे.

    पण पुढे काय?
    किती तरी रस्त्यावर मोकळे भटकत आहेत. देशाचे सोडा हो, एकट्या मुंबईमध्ये दोन लाखांवर आहेत ह XXXX र आहेत.!!!.
    आणि अगणित रोजच घुसखोरी करताहेत.
    मग..
    ...
    आपण फक्त वाट बघायची, आणि आज कुठेही स्फोट नाही म्हणून आनंदाने झोपावे,
    उद्याचे काय ? कुणी सांगावे?

    निघतील आजून चार बांडगुळे आणि करतील परत वस्त्रहरण...
    तोपर्यंत तरी 'पोजीतीव थिंकिंग' का काय म्हणतात न त्यावर शावासोछ्वास करत राहावा. म्हणजे जगल्यासारखे पण होईल.

    उत्तर द्याहटवा
  5. लल्लू म्हणतो कि त्याते अल्पसंखांक होता म्हणून त्याच्यावर अन्य्याय झाला!

    आताबोला !!

    उत्तर द्याहटवा
  6. सोरी निनादा,
    आम्ही तशी सरळसोट माणसे, मुळमुळीत गुडी गुडी नाही जमत. जे काय असेल ते एकदम सोक्षमोक्ष.

    सोशल सायीट वर ली शकतो पण व्यक्तिगत सायीटवर लिहिण्याचा, ....तेही तुझ्यासारख्या सज्जन आणि ध्येयाने प्रेरित असलेलेया पापभिरू उत्साही तरुणाच्या.... मला काही अधिकार नाही,
    ज्यास्तच कडक किंवा 'बाह्य' वाटले तर माझ्या टिपा DELETE करून टाकावे. मला काहीच दुख: नाही.

    उत्तर द्याहटवा
  7. परमानंद
    प्रतिसादात नेहमी भावना जर अस्सल असतील तर भाषेचे अवडंबर माजवणे मला पटत नाही. मात्र अश्लील व शिवराळ भाषा सार्वजनिक पटलावर मला मान्य नाही.
    तुमच्या सर्व प्रतिसादात ह्या दोन गोष्टी वगळता तुमच्या मनातील आक्रोश , द्वेष , आणि खदखद बाहेर पडली. अर्थात तुम्ही येथे मनमोकळेपणे अभिव्यक्त झाला.
    जसे आपण आपल्या घरची माणसे किंवा मित्रांसमोर होतो.
    माझ्या मनातील विचार मी ह्यासाठी ह्या ब्लॉग वर लिहितो जेणेकरून मला जगातील कानाकोपऱ्यातील निवासी , अनिवासी मराठी माणसांशी संवाद ,संपर्क साधता येईल.
    कारण आपणच एकमेकांना समजू शकतो ,
    राजकारणी राजकारण करणार तर अभिनेते सार्वजिक जीवनात सभ्यपणाचा अभिनय
    ह्यांना अपवाद आहेत हे मान्य .
    पण एरवी सामान्य माणूस सामान्य माणसाच्या भावना , मन समजू शकतो.
    मराठा तुतुका मेळवावा ,महाराष्ट्र धर्म वाढवावा.

    उत्तर द्याहटवा
  8. कसाब तो सिर्फ झाकी हे , अफीज अभी बी बाकी हे.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips