हिमवर्षाव

Blogger Tricks

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१२

सर्व हिंदू हे विचारवंत नसतात पण सर्व विचारवंत हे हिंदू द्वेष्टे असतात.

 सर्व हिंदू हे विचारवंत नसतात पण सर्व विचारवंत हे हिंदू द्वेष्टे असतात 
. मिसळपाव ह्या मराठी संकेत स्थळावर वर एका माजी सभासदाने बहुदा नाना असावा ह्याने हे वाक्य लिहले होते. साहेबांच्या अंत्ययात्रा थेट प्रक्षेपित करत असतांना काही मराठी वृत्त निवेदक मग ते इंग्रजीतून असो किंवा मराठीतून अत्यंत निकृष्ट , हलक्या , दर्जाचे वृत्त देत होते. त्यांनी घेतलेल्या मुलाखती असो किंवा वृत्त निवेदन ह्यात हिंदू हृदय सम्राटाला आदरांजली कमी व इतर बरीच जळजळ दिसून येत होती. पोटातील आम्लयुक्त जळजळ इनो ने दूर करता येते. मात्र वैचारिक जळजळ झाल्याने विखारी पत्रकारिता करणाऱ्या ह्या प्रसारमाध्यमांना कोणता डोस द्यावा ह्या विचार मला पडला आहे. 
मुंबईत एका मुस्लिम युवतीने फेसबुक वर बाळासाहेबांच्या साठी अपशब्द वापरले आणि तिच्या हिंदू मैत्रिणीने ते लाईक केले ह्यासाठी त्या दोघींना अटक होऊन कोर्टाने दिवसाची सजा सुनावली. मात्र ह्या प्रसारमाध्यमांना कोण आवरणार ?

 कार्पोरेट संस्कृतीचा पगडा राजकारणावर पडला आहे. ह्यामुळे राजनेते हे उद्योजक तर उद्योजक हे राजनेते बनले आहेत. ह्याचा परीसस्पर्श कार्यकर्त्यांना सुद्धा झाला आहे. म्हणूनच मिनरल पाण्याच्या बाटल्या, हातात मोबाईल. असा आधुनिक कार्यकर्त्यांचा थाट असतो. आता नुसत्या वडापाव वर आंदोलन करणारे , पोलिसांचा लाठीमार व ससेमिरा चुकवत भूमिगत आंदोलन करणारे कार्यकर्ते व त्यांच्याशी भावनिक नाते असणारे नेते हा भूतकाळ झाला आहे. पण काल तोच भूतकाळ काळाच्या सीमा ओलांडून शिवतीर्थावर जमला होता. आत्मियता , आंतरिक ओढ मनात आपल्या दैवता बद्दल अपार श्रद्धा , निष्ठा , जिव्हाळा मनात ठेवून २० लाखाचा जनसमुदाय मुंबईत रस्त्यावर दिसला होता.
 हे पाहून दिल्लीमधील काही नेते व त्यांची लटांबर असलेले प्रसारमाध्यम व त्यांचे हुजरे वृत्त निवेदक एरंडेल तेल पिऊन आल्यागत तोंड वाकडे करत ( खरे तर ही गर्दी पाहून त्यांचा तोंडाचा आ वासला होता.) बातम्या देत होते. जगभरातील प्रमुख प्रसारमाध्यम साहेबांच्या निधनाचे वृत्त प्रसारित करत होते. मी इंटरनेट वरून आपली मराठी ह्या साईट वरून आय बिन एन लोकमत ह्या वाहिनी द्वारा अंत्ययात्रा लाइव पाहत होतो. डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला मुंबई दंगलीचा जो मी चेहरा पुस्तकावर लगेच चढवला.




 दंगलीच्या वेळी मी मुंबईतील आमच्या बटाट्याच्या चाळीत होतो. आमच्या बाहेर सर्व मुसलमान वस्ती असूनही स्थानिक मुसलमानांकडून कोणतीही आगळीक घडली नाही. ह्याचे कारण लेखात उल्लेख आहे तसा शिवसैनिक आमच्यासाठी तेथे हजर होता. पण जेव्हा वांद्र्याच्या बेहेराम पाड्यांतून लांडे चाळ जाळायला आले. तेव्हा चाळीतील पोर शिव सैनिक असे मिळून हे आक्रमण आम्ही परतवून लावले. शाळकरी वयातील तो रोमांचित अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही, तेव्हा अवघा भगवा रंग एक झाला होता. साहेब होते म्हणून मुंबईत मराठी माणूस टिकून होता- आता मुंबई मध्ये मराठी माणुस पोरका झाला.
 नुकतेच काही दिवसांपूर्वी आझाद मैदानात ह्याच लांड्यांनी जो धुमाकूळ घातला तो पाहता देव न करो परत जर मुंबईत दंगल उसळली तर मराठी माणसाला वाली कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. बाळासाहेबांचा अनेक वर्ष इलाज करणारे डॉक्टर मुस्लिम धर्मीय होते. किंबहुना यांच्या शेवटच्या आजारपणात मुस्लिम डॉक्टर त्यांच्या सेवेस होते. ह्याबाबत साहेबांचे मत साधे होते की ह्या मातीत जन्माला त्याच्याशी इमान राखले म्हणजे मतभेद निर्माण होणार नाहीत.
 लहान वयात घरात लोकप्रभा , चित्र लेखा , मार्मिक अधून मधून यायचे. तेव्हा मार्मिक मधील आंतरराष्ट्रीय राजकारणावर साहेबांचे मार्मिक व्यंग चित्र यायचे.गल्फ वॉर वर  त्यांचे सद्दाम हुसेन वर अमेरिकन सैन्य असे सुरेख व्यंग चित्र आले होते. एक व्यंगचित्र १००० शब्दांहून जास्त परिणामकारक असते. ह्यातून आंतरराष्ट्रीय राज कारणाविषयी
गोडी वाचली. सामान्य जनतेला जगातील परिस्थितीची जाणीव करून देणारा दुसरा व्यंग चित्रकार मी पुढे कधीही पहिला नाही.  

. मी स्वतः कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही , पण एक गोष्ट नक्की साहेबांचे विरोधक असो किंवा समर्थक किंवा तटस्थ मराठी माणुस त्यांच्या जाण्याने एक क्षण का होईना हळहळला. एक युग संपले , एक अवतार संपला , एक पर्व संपून आता पुढे काय ह्यांची चर्चा आता सुरु आहे. माझा ह्या महा नेत्याला , महानायकाला सादर प्रणाम व विनम्र आदरांजली साहेब अर्थाने महाराष्ट्राचे फादर ऑफ स्टेट होते, बाकी कोणाचे राष्ट्रीय स्तरावर मारून मुटकून जनतेच्या माथी मारलेले बाप व त्यांचे माहात्म्य मी मानत नाही.</p>

1 टिप्पणी :

  1. mast uttam lekhhhh ... mi tethey antyayatret gelelo mhanun sangu ichito ki tethe 20 nahi tar 25 lakhahun jast shivsainik aaley hotey ... aapley likhan asech jomane chalu thev changale bhakkamritine karan hi prasarmadhammaa kitihi bhunkat asali khoteyy pan aamhala satya mahit ahe ani tyanchi lakhahun jast trp 1 manus pan nahi ghadvu shakat pan tu prakashit kelelya lekha sarakhe lekh thode ka hoinaa pan lakhmolacha manase nakki ghadvatillllllllllll Jai Maharashtra.......!!!!!!!!!

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips