हिमवर्षाव

Blogger Tricks

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

महानगर पालिका धुमशान धर्मयुद्ध उपसंहार

.
हा लेख लिहितांना आधी मी परत एकदा ते गाणे तू नळीवर ऐकले
उठा उठा आभाळ फाटले ....
सध्या मनसे च्या सर्व जागा सेनेने पटकावल्याने तसेस नाशिक व मुंबई मधील घसरगुंडी पाहता आभाळ खरोखर फाटले आहे ह्याची प्रचिती आली.    ह्या आधी मी     
मुंबई महानगर पालिका निवडणूक फुल टु घुमशान , दंगल , धर्मयुद्ध भाग एक
ह्या लेखातून होणाऱ्या निवडणुकांवर माझे मतांचे शिंतोडे उडवले होते ,त्यांचाच पुढचा भाग आज खरडत आहे.

नाशकात कलाकारांची परेड झाली त्यानंतर  पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन झाले तरीही अशी अवस्था का व्हावी.
ह्याचे एकमेव कारण गेल्या वर्षभरापासून असे आपल्या कामगिरीचे प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात सांगत राजसाहेब फिरले असते ,,जर  संघटनेला लागलेली गळती थांबविण्यासाठी वेळीच प्रयत्न करण्यात आले असते.
जर राजकीय चाणक्य पणा करत  सेना सोडून एखाद्या पक्षांची महाराष्ट्रात युती केली असती तर पक्षाला आहे त्या परिस्थिती पेक्ष्या बऱ्याच चांगल्या स्थितीत आणता आले असते..
त्यामानाने रामदास आठवले ह्याचे राजकारण आवडले.
मुंबईचे चक्क उपमहापौर पद  त्यांनी पदरात पडून घेतले.त्यासाठी भाजपने दिलेल्या जागा मान्य केल्या.
मुळात मनसे व सेने युती झाली असती तर सेनेपेक्षा मनसेला जास्त फायदा होता.
सेनेच्या १० जागा वाढल्या असत्या मात्र मनसेच्या १५ जागा अजून वाढल्या असत्या.
युती न होण्यामागील कारण माझ्यामते बाळा नांदगावकर ह्यांच्या एका मुलाखतीत सांगितले त्याप्रमाणे मनसे ने दिलेल्या ऑफर मध्ये सेनेला त्यांच्या आहेत तेवढ्या जागा मागितल्या होत्या ,खरी मेख त्यात आहेत
मागच्या निवडणुकीत मनसेला भले सेनेपेक्षा कमी जागा मिळाल्या असतील पण ज्या मिळाल्या त्या सेनेच्या बालेकिल्ल्यात होत्या .  प्रभादेवी दादर येथील
.   साहेबाच्या हयातीत भाजपाची साथ असतांना मनसेने त्या मिळवल्या होत्या
त्या काहीही करून सेनेला परत मिळवायच्या होत्या ,  मनसे राजकीयदृष्ट्या कमजोर झाली असतांना विशेतः भाजपचा बागुलबुवा दाखवून विधानसभा व कल्याण डोंबिवलीत सेनेने जास्त जागा मिळवल्या होत्या त्यामुळे यंदा त्यांना इतिहासाची पुनरावृत्ती करायची होती व ती  त्यांनी केली , आधीच्या निवडणुकीत मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा त्यांनी नक्कीच मिळवल्या.
माझ्या मते मनसेने जर  मराठी बालेकिल्ला असलेल्या जागा सेनेला सोडून जेथे भाजपाला सेने इतकी सामान संधी आहे अश्या ठिकाणी जरा जास्त जागा पदरात पडून घेतल्या. असत्या तर युती शक्य होती, म्हणजे दादर वरळी लालबाग परळ,  माझगाव , माहीम येथे सेने तर घाटकोपर मुलुंड बोरिवली येथे मनसे असे जागा वाटप असते.
तर दोन ठाकरे बंधूंना एकाच व्यासपीठावरून मराठी मतदारांना बाळासाहेबांच्या प्रतिमेच्या साक्षीने साद घातल्या गेली असती तर भगवी लाट येण्याची शक्यता होती.
अश्यावेळी भाजपाला ठरविण्यासाठी विरोधकांनी सुद्धा आपल्या तलवारी म्यांन केल्या असत्या.
किंवा ह्या प्रादेशिक पक्षाची छुपी युती सहजशक्य होती.
अमराठी भागात सेने मनसेचे उमेदवार तगडे देऊन भाजपाची मराठी मते कापणे व त्याबदल्यात मराठी बहुल   भागात  इतर पक्षांनी आपले तगडे उमदेवार देऊन
भाजपाची अमराठी मते कापली असती असती तर भाजपाची  पंचाईत होऊ शकत होती..
पण देशाच्या व मुंबईच्या सुदैवाने असे घडले नाही , भाऊबंदकी ,घराणेशाही व अंतर्गत बंडाळी ह्यामुळे  सेने व मनसे चे मनोमिलन झाले नाही.
पक्षांतरानंतर भीतीने आघाडीने एकत्र निवडणूक लढवली नाही .
समाजवादी आघाडी ह्यांचे बालेकिल्ले एकाच असल्याने महाआघाडी झाली नाही.
 खरे पाहता ओविसी मुस्लिम मते खेचणार ह्याची जाणीव असून  सुद्धा तिघे एकत्र आले नाही .
ह्यावेळी माझ्या अंदाजांच्या विपरीत ओविसी फॅक्टर मुंबईत विधानसभेइतका चालला नाही
समाजवादीने त्याचे बालेकिल्ले राखले
खरे पाहता समाजवादी चे सर्व प्राण उत्तर परदेशात अडकले असतांना मुंबईकडे लक्ष द्यायला एकही उत्तरप्रदेशच्या बडा नेता आला नाही.
तरीही त्यांनी त्यांच्या जागा राखल्या , ह्याउलट योगी आदित्यनाथ हे हिंदुत्वाचा धगधगता अंगार मुंबईत आला त्याच्या सोबतीला भोजपुरी  सुपरस्टार आणि दिल्ली भाजपाचे नेते मनोज तिवारी आले
यंदा हॉलंड ला युरोपियन भाजपाच्या संमेलनात त्यांना भेटण्याचा योग्य जुळून येईल अशी आशा आहे.
कोंग्रेज ने अजिबात अपेक्षा नसतांना ३०शी चा आकडा  पार केला.
खरे पाहता त्या संजय निरुपम चे कौतुक वाटते
त्यांचा मराठी मते असणारा कामात गट त्यांच्या विरोधात ,राणे प्रिया दत्त प्रचारात नाही तरीही मातब्बर विरोधकांच्या समोर निवडणून आणलेले नगरसेवक कौतुकास्पद
पण निकाल जाहीर होण्याच्या अगोदर होणाऱ्या पराभवाचे खापर आपल्या अंतर्गत विरोधकांच्या वर फोडून निकाल जाहीर झाल्यावर राजीनामा दिल्याने त्यांचे राजकीय इरादे वेगळे असल्याचे मला जाणवत आहे
कोंग्रेज मध्ये सेनेतून आल्यानंतर  प्रस्थापित झाल्यावर आता तेथे भविष्य दिसत नसून आता नॉन मराठी लोकांना मराठी लोकांच्या समवेत समाविष्ट करणारा भाजपचा पर्याय डोळ्यासमोर आहे
आपल्या १५ ते २० समर्थकांच्या सोबत ते भाजपा समाविष्ट झाले तर अपक्षांच्या मदतीने
भाजपचा महापौर होऊ शकतो , निरुपम ची राजकीय पुनर्वसन भाजप उत्तर प्रदेशापासून कुठेही अगदी मुंबईत सुद्धा करू शकते.
ह्याउलट अत्यंत कार्यक्षम मराठी गटाचे नेतृत्व करणारा कामत  गट १५ नगर सेवकांच्या समवेत भाजपच्या पक्षात गेला तरीही सत्ताकारण सध्या आहे .
आता वरील दोन्ही नेते जर सेनेत गेले तर राष्ट्रवादी मनसेच्या मदतीने सरकार स्थापन होऊ शकते.
आज मनसेचे २० आमदार असते तर किंग मेकरची भूमिका त्यांनी पार पाडली  असती.
मात्र राजाला साथ द्या हे गाणे मराठी  मतदारांनी ऐकले खरे मात्र बॉलिवूड गाण्याची चटक  लागलेल्या मराठी माणसाने साथ हे हिंदीतील ७ ह्याप्रमाणे ऐकले परिणामी मनसेचे  ७ नगरसेवक निवडून आले , पण त्यांनी सेनेचे मते खाऊन भाजपच्या यशाला हातभार लावला .
,मला वैयक्तिकरीत्या भाजप समर्थक असून मनसेच्या पानिपतचे दुःख झाले आहे ,
मनसेने भाजपाला आता बिनशर्त पाठींबा जाहीर केला तर राजकीय खळबळ उडेल आणि राजसाहेब चर्चेत येतील , नाहीतर
परत येरे माझ्या मागल्या प्रमाणे रुसवे फुगवे करत भाजप व सेनेची युती पाहणे जनतेच्या हातात आहे
भाजपाला सेनेची साथ मिळाली तर विरोधक मिळून ५० चा एकदा जेमतेम होतो अश्यावेळी केंद्रातून राज्यातून मुंबईला भरभरून दान मिळू शकते.
भाजपने देवेंद्रच्या रूपाने महाराष्ट्राच्या गेल्या काही दशकातील अत्यंत यशस्वी
मुख्यमंत्री लाभला आहे , मला त्यांच्यात २०२४ चा निवडणुकीतील संभाव्य पहिला मराठी पंतप्रधान पदाचा उमेदवार दिसत आहे.
तूर्तास इतके
आता घोडेबाजार तेजीत येणार
नोटबंदी ने राजकीय पक्षांच्या काळ्या पैशांची नसबंदी केल्याने भाजपाला पारदर्शी यश मिळवता आले , राज्यभर भाजपाला मिळालेले निर्भेळ यश
ज्यात मनसेचे नाशकात पिपरी व पुण्यात राष्ट्रवादीचा सुफडा साफ झाला ,पुणेकरांनी
दुपारची वामकुक्षी घेत  पारदर्शी कारभाराला साथ दिली , पुतळे हलविता हलविता राष्ट्रवादी पुण्यातून कधी हटवल्या गेली हे जाणत्या राजाच्या ध्यानात नाही आले.
भाजपाला व्हेंटिलेटर वर ठेवणाऱ्या सेनेला मुंबई व ठाणे सोडता उर्वरित महाराष्ट्रात मिळालेल्या जागा पाहता त्यांच्या पक्षातील चाणक्य आता भाजपने आपली साथ सोडली तर अकस्मात होणाऱ्या निवडणुकीसाठी काय करावे ह्या भीतीने व्हेंटिलेटर वर गेलेले आहेत .नोटबंदी मुळे  कदाचित गुजराती जैन समूह थोड्या प्रमाणात दुखावला गेला असेल पण त्यांच्या सोसायट्या समोर चिकन शिजवणाऱ्या पक्षाला ते मतदान करणार नाही ह्याची खात्री होती,
, खंजीर वाघ नखे , अस्मिता  मावळे कावळे अश्या   शाब्दिक शेवाळ्यात रुतलेल्या ७० च्या दशकातील राजकारण करणाऱ्या सतत तिरस्कारांची  भाषा करणाऱ्या  करणाऱ्या पक्षांना पारदर्शक उत्तर भाजपने दिले आहे तेव्हा कमळी बाई सारखे शब्द दारिद्र्य दाखवणे आता वाघोबाने कमी करावे ,,
रीतसर भाजप असा उल्लेख करावा
भाजप म्हणजे
भावना ,जबरदस्त ,पोहोचल्या ,
केंद्रात नरेंद्र , राज्यात देवेंद्र आणि मुंबई मध्ये सुद्धा पारदर्शक कारभाराची ग्वाही देणाऱ्या देवेंद्र चे राज्य येऊ दे
अवांतर उद्याचा सामना , फेकसत्ता  कुबेर वाणीसाठी जरूर वाचावा
आमची झाली तर वाढ त्यांची झाली तर सूज
असा सेनेचा खाक्या आहे तेव्हा उद्याच्या सामन्याची वाट पाहत आहे.

२ टिप्पण्या :


  1. It is in reality a nice and useful piece of info. I am happy that you shared this useful info with us. Please keep us informed like this. Thank you for sharing. netflix login

    उत्तर द्याहटवा
  2. In addition, there can be a $70 registration fee for that land transfer tax. mortgage calculator Our calculator also may include mortgage default insurance (CMHC insurance), land transfer tax and property taxes. mortgage calculator

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips